सथानकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशी; सहा वर्षांनंतर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
सथानकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशी; सहा वर्षांनंतर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
चेन्नई, दि. ६ एप्रिल २०२६ : देशभर संतापाची लाट उसळवणाऱ्या सथानकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात अखेर न्याय मिळाला. मदुराई खंडपीठाने या प्रकरणातील नऊ आरोपी पोलिसांना दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने हा गुन्हा “अतिदुर्मिळ” स्वरूपाचा असल्याचे नमूद करत कठोर शिक्षा दिली.
२० जून २०२० रोजी सथानकुलम येथील व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेन्निक्स यांना लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावर पोलिसांनी ताब्यात घेतले. दुकान ठरलेल्या वेळेनंतर सुरू ठेवल्याचा आरोप होता. ताब्यात घेतल्यानंतर कोठडीत बाप-लेकाला रात्रभर अमानुष मारहाण करण्यात आली. या क्रूर मारहाणीमुळे अतिरक्तस्राव होऊन दोघांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला.
प्रकरणाची गंभीरता पाहता तपास केंद्रीय अन्वेषण अधिकाऱ्यांकडे (CBI) सोपवण्यात आला. तपासात पोलिसांकडून पूर्वनियोजित छळ झाल्याचे उघड झाले. आरोपींनी जाणीवपूर्वक क्रूरता दाखवल्याचे निष्पन्न झाले.
न्यायालयाने निकालात म्हटले,
हा सत्तेचा उघड गैरवापर आहे.
आरोपींची कृती अत्यंत निर्दयी आणि अमानुष होती.
कायद्याचे रक्षकच गुन्हेगार बनल्यास समाजाला धोका निर्माण होतो.
या आधारावर सर्वांनाच फाशीची शिक्षा ठोठावली.
या घटनेमुळे कोठडीतील अत्याचारांचा मुद्दा देशव्यापी चर्चेत आला. मानवी हक्क संघटना कडक कारवाईची मागणी करत होत्या. सहा वर्षांनंतर या निकालाने पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी, पुणे
९८२२५४८४२९