Maharashtra

महाराष्ट्रातील शाळांच्या सहलींसाठी आता फक्त एसटी बसच अनिवार्य

महाराष्ट्रातील शाळांच्या सहलींसाठी आता फक्त एसटी बसच अनिवार्य

राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त विजय तिराणकर यांनी सर्व प्रादेशिक अधिकाऱ्यांना आदेश दिले असून, शाळांच्या सहलींसाठी खासगी बस किंवा स्कूलबसचा वापर केल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या नियमांचे पालन करूनच सहली घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यामुळे आता शाळांना सहलींसाठी ‘लालपरी’ (एसटी बस) वापरणे अनिवार्य ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह नियमबद्ध प्रवास हा निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.

शिक्षण विभागाने सहली ऐतिहासिक स्थळांकडे नेण्याचे नवीन निर्देश दिले असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सांस्कृतिक अनुभव मिळावा यावर भर देण्यात आला आहे.

दरम्यान, सर्व शाळांना एसटी बस उपलब्ध करून देणे आणि सामान्य प्रवाशांसाठी बस सेवा सुरळीत ठेवणे हे एसटी महामंडळासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.

मुख्य नियम:

सहल फक्त एसटी बसनेच

50 विद्यार्थ्यांमागे 5 शिक्षक अनिवार्य

मुलींकरिता महिला शिक्षक असणे आवश्यक

शिक्षण विभागाची नियमावली पूर्णपणे पाळणे बंधनकारक आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button