Maharashtra

शिर्डीहून शिंगणापूरला जाताना काळाचा घाला; भरधाव मिनीबसची रिक्षाला धडक, तिघा मित्रांचा जागीच मृत्यू.

 

राहुरी (प्रतिनिधी):७/०१/२०२६ रोजी शिर्डीहून शनि शिंगणापूरकडे जात असताना राहुरी–शिंगणापूर रस्त्यावर आज पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या मिनीबसने समोरून जाणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत रिक्षामधील तिघा मित्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची तीव्रता इतकी होती की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, रिक्षातील तिघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

प्राथमिक तपासात मिनीबसचा वेग अतिवेगात असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button