प्रभाग २४ ‘ब’ मधून नारळ फोडायला सज्ज उज्वला गौड – ढोंगी राजकारणाला थेट आव्हान

प्रभाग २४ ‘ब’ मधून नारळ फोडायला सज्ज उज्वला गौड – ढोंगी राजकारणाला थेट आव्हान
आजच्या राजकारणात मतांसाठी भूमिका बदलणारे, सोयीसाठी मौन पाळणारे आणि निवडणुकीपुरते हिंदुत्व आठवणारे चेहरे मोठ्या संख्येने दिसतात. अशा परिस्थितीत प्रभाग क्रमांक २४ ‘ब’ मधून ‘नारळ’ या निवडणूक चिन्हासह मैदानात उतरलेल्या उज्वला गौड या ढोंगी राजकारणावर थेट प्रहार करत आहेत.
लव्ह जिहाद, लँड जिहाद, बेकायदेशीर घुसखोरी, महिलांवरील वाढते अत्याचार, कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा—या विषयांवर गप्प बसणे म्हणजे गुन्हेगारांना मोकळे रान देणे आहे, असा थेट सवाल उज्वला गौड उपस्थित करतात. भीतीपोटी किंवा मतांच्या गणितासाठी जे बोलत नाहीत, त्यांच्यावर जनतेने प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
“एक मत हिंदुत्वाला, एक मत सनातन संस्कृतीला” हा नारा केवळ घोषणा नाही, तर तो लढ्याचा एल्गार आहे. सत्ता मिळवून तडजोड करणाऱ्यांपेक्षा, सत्ता नसेल तरी सत्य बोलणारे नेतृत्व समाजाला हवे आहे—आणि ती भूमिका उज्वला गौड घेत आहेत.
प्रभाग २४ ‘ब’ मधील नागरिक वर्षानुवर्षे फसवणूक, खोटी आश्वासने आणि कामाच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराला कंटाळले आहेत. रस्ते, पाणी, स्वच्छता, सुरक्षेचे प्रश्न प्रलंबित असताना सत्ताधाऱ्यांची मौनाची भूमिका जनतेसाठी अपमानास्पद आहे. उज्वला गौड या प्रश्नांवर केवळ बोट दाखवत नाहीत, तर थेट संघर्षाची तयारी दर्शवत आहेत.
आता प्रश्न स्पष्ट आहे—
ढोंगी, भीतीपोटी गप्प बसणारे प्रतिनिधी की
निर्भय, ठाम आणि तडजोड न करणारे नेतृत्व?
प्रभाग २४ ‘ब’ मध्ये ‘नारळ’ हे केवळ चिन्ह राहिलेले नाही, तर ते भ्रष्ट आणि निष्क्रिय राजकारणाच्या कपाळावर फोडला जाणारा प्रहार ठरत आहे. उज्वला गौड या केवळ उमेदवार नाहीत—त्या लढ्याचे प्रतीक बनत चालल्या आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429
