Maharashtra

“निवडणूक आयोगाचा निर्णय: राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा, ‘पिपाणी’ चिन्ह कायमचे वगळले”

🗳️ “पिपाणी चिन्हावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलासा”

निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तक्रारीचा विचार करून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून ‘पिपाणी’ (ट्रम्पेट) हे स्वतंत्र चिन्ह कायमचे वगळले आहे.

‘पिपाणी’ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत चिन्ह ‘तुतारी’ यांच्यात साधर्म्य असल्याने मतदारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण होत होता. परिणामी अनेक अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्हावर मोठ्या प्रमाणात मते मिळाली होती, ज्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बसला होता.

आता निवडणूक आयोगाने १९४ मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ चिन्ह हटवले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे.

पक्षाने आयोगाकडे वारंवार तक्रारी दाखल करून मतांची विभागणी झाल्याने अनेक आमदार पराभूत झाल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर आयोगाने घेतलेला हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरतो आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button